India Constitution भारतीय संविधान - उद्देशिका

 


उद्देशिका

आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस :

सामाजिक , आर्थिक व राजकीय न्याय ;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास , श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य ;

दर्जाची व संधीची समानता ;

निष्टीपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवार्धीत करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून ;

आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर , १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

Search Any

'Ex Post Facto Law' 'घटनेनंतरचा कायदा'

  भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २०(१) मध्ये 'घटनेनंतरचा कायदा' किंवा 'Ex Post Facto Law' विरुद्ध संरक्षणाची तरतूद दिली आहे. य...