भारत सरकार
संविधानाच्या
अनुच्छेद एक मध्ये असे म्हटले आहे की इंडिया म्हणजे भारत हा संघराज्यांचा संघ आहे.
सध्या भारतामध्ये 28 राज्य व सात संघराज्य क्षेत्र आहेत. राज्यांची व संघ राज्यांची
नावे, संविधानाच्या अनुसूची एक मध्ये दिलेली आहेत. उत्तरांचल झारखंड व छत्तीसगड ही
तीन राज्य अलीकडेच सन 2000 मध्ये स्थापन केली आहेत. भारताच्या राज्यात क्षेत्रात राज्य
संघराज्य क्षेत्रे यांचे राज्यक्षेत्रे व वेळोवेळी संपादित करता येतील अशा अन्य राज्यात
क्षेत्रांचा समावेश होतो. हे सर्व मिळून भारत सरकार हे अधिकाऱ्यांच्या वितरणासह एक
संघीय सरकार आहे. न्यायमंडळ हे संविधानाचे व इतर कायद्यांचे भाष्यकार आहे. भारत हा
संघ आहे किंवा नाही याबाबत विरोधी विचारधारा असली तरी काही लेखकांच्या मते ते संघवत
असून ते असे दर्शविते की संविधान हे एक संघ आहे
